नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात व्यापारी संस्थांसाठी धनतेरस एक सुवर्ण संधी ठरली. कोरोना काळात अनेक नकारात्मक गोष्टींशी झुंज घेतलेल्या लोकांना धनतेरसला सेलिब्रेट करण्याची संधी मिळली आहे. मोठ्या संख्येने लोक बाजारासाठी बाहेर पडले होते आणि जोरदार खरेदी केली आहे. गावे आणि छोट्या-मोठ्या शहरात धनतेरसला खुप चांगला व्यापार झाल्याचे दिसून आले. व्यापार्यांचे म्हणणे आहे की, आगामी लग्नसराईत सुद्धा चांगला व्यापर होण्याची आशा आहे आणि तत्पूर्वी बहुतांश सेक्टरमधील व्यवसाय कोरोनाच्या अगोदरच्या स्तरावर येईल. जाणून घेऊयात की व्यापारी आणि अधिकार्यांचे या संबंधी काय म्हणणे आहे.
नऊ महिन्यानंतर सराफा बाजारात आली चमक
या धनतेरसला बाजारात अगोदरची चमक परतली आहे. देशभरात ज्वेलरी मार्केटचे सुवर्ण वलय सुमारे नऊ महिन्यानंतर परतले आहे. धनतेरसला देशभरात समाधानी चेहरे नवे दागदागिने खरेदी करताना दिसले. कोरोनानंतर पुन्हा 80 टक्के व्यापर रूळावर आला आहे.
कमी महाग सामानाची झाली भरपूर विक्री
इंडस्ट्री कमेटी पीएचडीचे चेयरमन संदीप अग्रवाल म्हणाले, धनतेरसला स्वस्त सामानाची भरपूर विक्री होत आहे. कृषी क्षेत्रात चांगली वाढ होत आहे. सरकारकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या उपायांमुळे मागणीमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. मात्र, मेट्रो सिटीजमध्ये व्यापर तेवढा चांगला दिसून आला नाही. डायमंड ज्वेलरी, महागडे एसी यासारख्या महागड्या उत्पादनांमध्ये डिमांड रिकव्हरी संथ आहे.
दिसले सकारात्मक संकेत
फिक्कीच्या अध्यक्षा डॉ. संगीता रेड्डी यांनी म्हटले की, बाजारात अनेक सकारात्मक संकेत दिसून आले. जे अर्थव्यवस्थेत वेगाने रिकव्हरी दर्शवत आहेत. अर्थमंत्र्यांनी देशाला दिवाळीची मोठी भेट दिली आहे, जी वाढ, रोजगार आणि निर्यातीला प्रोत्साहन देईल. सोबतच भारताला ग्लोबल व्हॅल्यू चेनचा भाग बनवेल.
धनतेरसला दिसली ग्राहकांची क्षमता
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रेसिडेंट संजय अग्रवाल यांनी म्हटले, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ऑक्टोबर महिन्यात वाढून 58.9 वर आला, जो सप्टेंबरमध्ये 56.8 वर होता. भारताच्या निर्मिती क्षेत्रात व्यापारी हालचाली एक दशकाच्या उच्च स्तरावर आल्या आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेत आणि आपल्या ग्राहकांमध्ये खुप क्षमता आहेत. हिच क्षमता धनतेरसच्या निमित्ताने पहायला मिळत आहे.