नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवार (1 फेब्रुवारी) हा दिवस मोदी सरकारसह संपूर्ण देशासाठी खुप खास होता. सर्वसामान्य माणून जिथे काही नव्या घोषणांच्या प्रतिक्षेत होता तर तिकडे सरकार पुढे काही आव्हाने होती. शनिवारी सकाळी ठीक 11 वाजाता जसे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटचे भाषण सुरू केले तसे शेतकरी, महिला, कामगार, व्यापार्यांसह संपूर्ण देशात आशेचे किरण दिसू लागले.
यावेळेला करदाते आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. जर आपण म्हणालो की अर्थसंकल्पाने अपेक्षा पूर्ण केल्या तर ते चुकीचेही ठरणार नाही. परंतु, सोशल मीडियाचा मूड काही वेगळाच दिसत होता. येथे कुठे आनंद कुठे दु:ख दिसत होते. जाणून घेवूया बजेट 2020 बाबत सोशल मीडियावरील जनतेचे काय म्हणणे आहे.