बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत वित्तीय वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात संपूर्ण देशाला या अर्थसंकल्पातून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, अर्थमंत्र्यांनी जनतेला निराश केलेलं नाही. कोरोनाचं जागतिक संकट असतानाही अनेक गोष्टींवरील आयात कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सीतारामण यांनी म्हटले आहे.
– सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होणार
– तांब्याच्या वस्तू
– स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
– परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होणार
– मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढवण्यात आल्याने मोबाइलच्या किमती वाढणार
– परदेशातून आयात केले जाणारे कपडे
– कॉटनचे कपडे महागणार