बीड : बहुजननामा ऑनलाइन – संविधान वाचवायचे असेल तर बौध्द अनुयायांनी सत्ता संपादन केली पाहिजे. बाबासाहेबांचा विचार कृतीतून पुढे नेणाऱ्यांना साथ द्यायला हवी. धम्म आचरणातूनच लोकशाही मजबूत होते, असे प्रतिपादन ज्ञानरक्षीत महाथेरो यांनी केले.
तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन यांच्या वतीने तालुक्यातील चांदापूर येथे शंकरराव जगतकर नगरीत धम्म ध्वजारोहणाने परिषदेला सुरुवात झाली. भदन्त उपगुप्त महाथेरो, भिक्खू ज्ञानरक्षीत, भिक्खू पय्यारत्न (नांदेड), भिक्खू धम्मशील, भिक्खू प्रज्ञानंद ,भिक्खू शरणंकर थेरो, भिक्खू धम्मसेवक थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागताध्यक्षपदी ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप हनुमंतराव उपरे हे होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त केशव कांबळे(लातूर) व त्रिवेणी कसबे-पोटभरे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अव्वल क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या अनुष्का दामोदर सोनवणे हिचा रोख आकरा हजार रूपये, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे होते. ॲड.अनंतराव जगतकर,सरपंच मनोहर केदार , प्रा.डॉ.विनोद जगतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी भिक्खू शरणंकर थेरो, भिक्खू प्रज्ञानंद, भिक्खू धम्मशील, भिक्खू पय्यारत्न थेरो यांनी धम्मदेसना दिली. परिषदेच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत इंगळे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, जगन सरवदे, सचिन वाघमारे, विश्वनाथ भालेराव, सुरेखा रोडे, प्रा.गौतम गायकवाड, मुरलीधर कांबळे, सुनंदा शिंदे, अमोल वेडे, आकाश वेडे,माणिक रोडे, मधुकर वेडे, मिलिंद नरबागे, राज जगतकर, प्रभाकर बडे, प्रा.बी.एस.बनसोडे, राजाभाऊ घाटे, संजय साळवे, दयानंद सावळे, सुरेखा रोडे, अर्जुन काळे, आकाश वेडे, प्रा. विनोद जगततर, धनंजय जोगदंड, सुशील इंगळे, शीला जोगदंड, रुक्मिण गोरे, संदीप वैद्य, प्रा.बालाजी जगतकर यांनी परिश्रम घेतले.