नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमध्ये एका सभेदरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत जे लोकं कागदपत्रे पाहण्यासाठी घरी येतील, त्यांना सांगा की आम्ही या देशात ८०० वर्षे राज्य केले आहे.
ही चारमीनार माझ्या वडिलांनी बनवली आहे, तुझ्या बापाने नाही, असे विधान अकबरुद्दीन यांनी केले आहे. तसेच पुढे त्यांनी ‘कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नसून ते काय बोलतात ते मान्य करण्याचीही आपल्याला गरज नाही. जे लोक मुस्लिमांकडे काय आहे, असे विचारतात त्यांना मी सांगतो की तू माझी कागदपत्रे तपासू इच्छितो.
मी ८०० वर्षांपर्यंत या देशात राज्य केले असून शौर्य गाजवले आहे. हा देश माझा होता, आहे आणि माझा राहील. माझे वडील आणि माझ्या आजोबांनी या देशाला चारमीनार दिली, कुतुबमीनार दिली, जामा मशीद दिली. या देशाचा पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकावतो, तो लाल किल्लाही आमच्याच पूर्वजांनीच दिला आहे,’ असे आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे.
Visit : bahujannama.com