वनक्षेत्रातून पाईपलाईन टाकण्यासाठी मागितली 1 लाखांची लाच; वनपालासह दोन वनरक्षकांना अटक

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – शेतीसाठी पाण्याची पाईप लाईन टाकण्यास परवानी देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना वनपरिक्षेत्रातील वन परिमंडळ कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनपाल आणि दोन वनरक्षकांना रंगेहाथ पकडले.
वनपाल अनिल चंद्रभान दळवी (वय ५०, रा. विंचूर दळवी, ता. सिन्नर), वनरक्षक उस्मान गणीमलंग सय्यद (वय ४९, रा. फॉरेस्ट कॉलनी, वणी) आणि सुरेखा अश्रुबा खजे (रा. संस्कृतीनगर, वणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.
वणीजवळील चिंचखेड गावातील शेतजमिनीच्या बाजूस असलेल्या एका वनक्षेत्रातून खोदलेल्या चरावरुन पाण्याची पाईप लाईन शेतीपर्यंत टाकण्याच्या कामाला परवानगी मिळावी, यासाठी तक्रारदाराने वनाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केला होता. वनाधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना १ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर त्यांच्यात तडजोड होऊन ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने खात्री करत पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार शेतकरी वणी येथील वन परिमंडळ कार्यालयात असले असता ५० हजार रुपये स्वीकारताना छापा घालून तिघांना पकडण्यात आले.
Comments are closed.