बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यातील महाविकासआघाडी सरकारला काही दिवसानंतर वर्षपूर्ती होईल. याच(bother ) निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला मुख्यमंत्री उद्धव यांनी खास मुलाखत दिलेली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियात प्रसिद्ध केला. त्यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दम देत इशारा देताना दिसत आहेत. मात्र, यावरून (bother )भाजपा आमदार अतुल भातखळकर हे आक्रमक झाले आहेत.
याबाबत आमदार अतुल भातखळकर यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, की मुख्यमंत्र्यांची उद्याच्या सामन्यात मुलाखत प्रसिद्ध होईल. त्यातील भाषा ही दुर्दैवी तर आहेच पण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री दात पाडीन सुडाचे राजकारण करेन अशी भाषा करतात. हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातलं आहे. मुख्यमंत्री आहेत की एखाद्या गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख म्हणून ते बोलत आहेत असा प्रश्न पडतो? असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
जपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा देत म्हणाले, की तसंच बायका, मुलं आम्हाला पण आहे म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो आणि त्यांच्या धमक्यांना घाबरतो. त्यांच्या धमक्यांना घाबरलं या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये. व्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करावी. दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये.
मुलाखतीच्या प्रोमोत काय म्हणाले उद्धव ठाकरे
४४ सेकंदाचा प्रोमो आहे. उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात? काय उत्तरे देतात? याची झलक दिसत आहेत. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर विचार केल्याचं दिसत आहे. मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्या पलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा देत उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, की “ठीक आहे हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे जाईल” असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले त्या येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल.
महाविकासआघाडीला वर्ष पूर्ण होत आहे ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या “अभिनंदन” मुलाखतीचा प्रमुख पोस्ट करताना राऊत यांनी “उद्या धमाका” असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.