नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – ‘दीक्षाभूमीची गौरवगाथा’ हा एकमेव ग्रंथ प्रत्येक वाचकाला दीक्षाभूमीच्या इतिहासाची जवळून ओळख करून देणारा आहे. तसेच नागपूर येथील पवीत्र दीक्षाभूमीचा गौरव करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या रूपाने दीक्षाभूमीच्या इतिहासात अभ्यासपूर्ण भर पडणार आहे. असे प्रतिपादन पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनातील सर्व मान्यवरांनी केले.जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे अलीकडेच आयोजित या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रा. डॉ. रवींद्र तिरपुडे संपादीत ‘दीक्षाभूमीची गौरवगाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस. ज्येष्ठ नाटककार-लेखक प्रेमानंद गज्वी. संघरामगीरी संघनायक भिक्कू संघ भदन्त ज्ञानज्योती महाथेरो. स्वागताध्यक्ष प्रसिद्ध कवी व लेखक अॅड. भूपेश पाटील. सहस्वागताध्यक्ष सुरेश डांगे. डॉ. धनराज खानोरकर. झाडीबोलीतील साहित्यिक ना. गो. थुटे. आत्माराम ढोक. डॉ. विद्याधर बन्सोड. प्रा. वामन शेळमाके. किशोर गजभिये. शुद्धोधन कांबळे. महेश मोरे उपस्थित होते.
या ग्रंथात दीक्षाभूमी विषयीचे अभ्यासपूर्ण चिंतन करणाऱ्या विविध लेखकांच्या ३६ लेखांचा समावेश आहे. यावेळी विविध साहित्यिकांच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले