नवी दिल्ली: वृत्तसंस्था – तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही धक्कादायक घटना घडली असून यातील दोन मुलींचा मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान प्राथमिक तपासात विषबाधेने मृत्यू झाल्याचं समोर येत असलं तरी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बबुरहा गावातील तीन मुली जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती समजताच त्यांना तत्काळ जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून चौकशी सुरु केली आहे. या तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.
3 girls were found lying unconscious in their own farm in Asoha, Unnao Dist, today. 2 girls died at the hospital, one referred to District Hospital. As per initial info, the girls had gone to cut grass. The doctor states that there are symptoms of poisoning; probe on: SP Unnao pic.twitter.com/IJO4L7GtUk
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 17, 2021
रुग्णालय तसेच गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी तब्यत घेतले आहे. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून खळबळ निर्माण झाली आहे. तर मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघी जणी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या असल्याचं म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.
थाना असोहा क्षेत्रांतर्गत ग्राम बबुरहा में दो मृत एवं एक बेहोश लड़की मिलने के संदर्भ में SP उन्नाव द्वारा दी गई बाइट @Uppolice @dgpup @adgzonelucknow @Igrangelucknow pic.twitter.com/03y8H6gP0W
— UNNAO POLICE (@unnaopolice) February 17, 2021
दरम्यान या घटनेसंदर्भात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील घटना अत्यंत भयावह असल्याचे त्यांनी म्हणतील आहे. दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. एक जखमी आहे. मुलीला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने एम्स दिल्ली येथे आणायला हवे. आम्ही आता कोणत्याही स्थितीत हाथरसची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आमची टीम घटनास्थळी जात आहे. बहिणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही असंही आझाद यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मृतदेह जाळला
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मोतिहारी येथे २१ जानेवारीला घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा मोतिहारीतील कुंडवा चैनपुर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह दोघांवर आरोप करण्यात आला असून कारवाई होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या एका मुलीवर मोतिहारीच्या कुंडवा चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी दोन फेब्रुवारीला एफआयआर दाखल केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कुंडवा चैनपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. एफआयआर दाखल करण्यास नकार दिला होता, असा आरोप करण्यात आला आहे.