इस्लामपूर बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीच्या धास्तीनेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते भाजपमध्ये जात आहेत. तर राष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात आहेत. असी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव सचिन माळी यांनी दिली.
इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलते होते. त्यावेळी ते म्हणाले की, ६ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील, किसनराव चव्हाण, रेखा ठाकूर, अशोक सोनवणे हे मुलाखती घेणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरु आहे. कॉंग्रेसला ४० जागांच्या दिलेल्या प्रस्तावावर अद्यापही प्रतिसाद आलेला नाही. आंबेडकर-औवेसी यांच्या नेतृत्वाखाली सर्व २८८ जागा लढण्याची तयारी झाली आहे. घराणेशाहीमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत भाजप विरुद्ध वंचित असाच सामाना होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.