पुणे : बहुजननामा ऑनलाईन – BJP Vs Shivsena | मागील काही दिवसापूर्वी राज्यात अनेक घडामोडी बघायला मिळाल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात भाजप आणि शिवसेना (BJP Vs Shivsena) आमने-सामने भिडले. नंतर राणेंच्या अटकपात्रानंतर त्यांना आलेली सुटका. याचे पडसाद अजूनही टीकाटिपणी मध्ये दिसत आहे. यांनतर आता शिवसेना नेते आणि महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील राणेंवर निशाणा साधला. ‘नाव राणे आणि चर्चा मात्र चार आण्याची करतात असा जोरदार निशाणा अब्दुल सत्तार यांनी केलाय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आज (शनिवारी) पुण्यात (Pune) एका ग्राम पंचायतीच्या कार्यालयाचं उदघाटन करताना बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना फक्त बोलण्यासाठी भाजपमध्ये घेतलंय. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्चा फक्त चार आण्याची करतात, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
‘बाळासाहेबांनी नाऱ्याचा नारायण केला…
पुढं बोलताना सत्तार म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी नाऱ्यापासून त्यांना नारायण राणेंपर्यंत पोहोचवलं.
त्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे होतं. पण ते विसरलेले दिसततात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आणि राणे कुठे? असं देखील अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंना पक्षात घेऊन भाजपाने खूप मोठी चूक केली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ‘भाजपासोबतच नातं खूप चांगलं होतं.
मात्र, राणेंच्या समावेशानं आता नात्यात खूप वितुष्ट निर्माण झालंय.
भाजपा आमच्या सोबत होता तोवर ते आंब्याच्या झाडाखाली बसले होते.
पण आता राणेंच्या समावेशामुळे ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत, भाजपानं याचं आत्मचिंतन करावं, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
Web Title : BJP Vs Shivsena | abdul sattar slams narayan rane over controversial statement in hadapsar of pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Earn Money | लवकरच सुरू करा ‘हे’ काम, वर्षाला 30 लाखाच्या कमाईची शक्यता; जाणून घ्या सोपी पध्दत