मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आज मागील विधानसभेचा कार्यकाळ संपला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत झालेल्या बैठकीत सत्ता न स्थापन करण्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याच आरोपांच खंडन करत पत्रकार परिषदेत घेतली. ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते म्हणून मी पाठींबा दिला होता. परंतु अडीच -अडीच असं काही ठरलं नव्हतं हे तुम्ही बोलणार असाल तर मी खोटं बोलून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी उदयनराजे यांचा दाखला देत भाजपचा खोटारडेपणा उघड आणला आहे. उदयनराजेंनी अनेकदा नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती परंतु भाजपने उदयनराजे यांच्याशी जवळीक केली आणि तुम्ही उदयनराजेंकडून पगडी घालून घेऊन आम्हाला टोप्या घातल्या असल्याची टीका देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि, महाराष्ट्राच्या जनतेचा जेवढा विश्वास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे तेवढा विश्वास अमित शहा आणि कंपनीवर नाही. ठाकरे घराण्यावर कोणीतरी पहिल्यांदा खोटारडेपणाचे आरोप केले आहेत, परंतु मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरजदेखील नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
Visit : bahujannama.com