मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) प्रतिपादन केले की, आमच्या सरकारने ग्रामीण भागात 30 हजार किमीचे रस्ते बांधले. हा एक प्रकारचा इतिहासच आहे. युती सरकारने विविध योजना आणल्या. मात्र, पूर्वीच्या सरकारने काय केले ? आणि आता भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्यामुळे भरती नाही, असे देखील फडणवीस म्हणाले.
आमच्या सरकारने शिक्षणातही सुधारणा केली. शिक्षणात यापूर्वी महाराष्ट्राचा क्रमांक 17 वा होता. आता तीन वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. येत्या काळात पहिल्या क्रमांकावर येईल, याचा विश्वास आहे असे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत बोलत आहेत. मागच्या सरकारपेक्षा आम्ही जास्त कामे केलीत. पंचवीस टक्के रोजगार एकट्या महाराष्ट्रात निर्माण केला. आजही तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. जनता मालक आहे तर आम्ही सेवक आहोत.
तसेच ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने आदिवासी मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. काही मुलांना स्वयंरोजगार योजनेतून त्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली. राज्य सरकारच्या माध्यमातून दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली.