मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईतील मलजल पम्पिंग केंद्रावरून काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेवर आरोप केला होता. त्यावर आता भाजप BJP नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले, की ‘हरित लवादाने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे घणाघाती आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांचे आहेत…दुभत्या म्हशीच्या लाथा गोड’.
जो मलजल प्रक्रिया प्रकल्प २०१७ ला पूर्ण होणे अपेक्षित होते त्याचे काम शिवसेनेच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अजूनही सुरू झालेले नाही. हरित लवादाने महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे घणाघाती आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांचे आहेत… दुभत्या म्हशी च्या लाथा गोड. pic.twitter.com/ovsLoPx739
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 13, 2021
मुंबईमध्ये मलजल पम्पिंग केंद्राच्या प्रकल्पाचे काम महापालिकेतील अकार्यक्षम सत्ताधारी शिवसेनेमुळेच रखडल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला होता. त्यावर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले, की जो मलजल प्रक्रिया प्रकल्प 2017 ला पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याचे काम शिवसेनेच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अजूनही सुरू झालेले नाही. हरित लवादाने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे घणाघाती आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांचे आहेत…दुभत्या म्हशीच्या लाथा गोड, असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला.
महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे नूतनीकरण जे ३ वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते ते आज १२ वर्षांनंतर देखील पूर्ण झालेले (केलेले) नाही. अपेक्षित खर्च ८५ कोटींवरून ११९ कोटी इतका वाढला (वाढवला) आहे… टक्केवारीसाठी सर्वकाही… pic.twitter.com/wohMrNygNV
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 13, 2021
दरम्यान, महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे नूतनीकरण जे 3 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. ते आज 12 वर्षांनंतरही पूर्ण झालेले (केलेले) नाही. अपेक्षित खर्च 85 कोटींवरून 119 कोटी इतका वाढला (वाढवला) आहे…टक्केवारीसाठी सर्वकाही…, असेही त्यांनी ट्विट केले आहे.
शरजील उस्मानीवरूनही टीका
शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गुपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की, या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.