बहुजननामा ऑनलाईन टीम : केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी हे दिलखुलास नेते म्हणून ओळखले जातात. ते नेहमीच अनेक किस्से सांगत असतात. नुकताच पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमातही नितीन गडकरी यांनी बोलताना किस्सा सांगितलं ज्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
गडकरींनी सांगितले कि “देशभरातील उद्योग व्यवसायांसंबंधी एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी भारतात उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील चीनमधून आयात केले जात असल्याची माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलं की, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?,” असा किस्सा नितीन गडकरी यांनी उपस्थितांना ऐकवला.
ते पुढे म्हणाले, “आपल्या देशात उद्योग व्यवसाय वाढीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात यावे. तसेच कृषी मालवाहतूक रेल्वेने वाढली पाहिजे, बांबूपासून तेल मिळत असल्याने बांबूशेतीला चालना देण्यात येणार आहे,” तसेच काही वर्षात दिल्ली-मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल. यामुळे १३ ते १४ तासांमध्ये अंतर पार करता येणार असून देशात अशा स्वरुपाचे आणखी तीन हायवे बनविण्याची योजना आखली जात आहे. सर्व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात आहेत. अनेक शरांबाहेर देखील उद्योग व्यवसाय जाण्याची गरज असून त्यासाठी विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचं,” यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितलं.
Visit : bahujannama.com