मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – २०१४ च्या निवडणुकीत अच्छे दिनाच्या नावाखाली जनतेने नरेंद्र मोदींच्या हाती बहुमत दिले परंतु मोदींनी त्याचा गैरवापर करत लोकांच्या अपेक्षांचा भंग केला आहे. मेक इन इंडियाच्या करारातुन खोटी गुंतवणुक, बेरोजगार लोकांना वर्षाला २ कोटी रोजगार देण्याच्या भाजपाने निव्वळ बाता मारत पाच वर्षे वाया घालवली, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांच्या सभा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे मोदीं सरकारचा पोलखोल करणाऱ्या या सभा आहेत मुंबईतील काळाचौकी येथे मंगळवारी आयोजित केेलेल्या मनसेच्या सभेत ते बोलत होते. राज म्हणाले, भाजपाने स्थापन केलेल्या आयटी सेलमधील मुले खोट्या बातम्या पसरवुन देशाची फसवणूक करत आहेत.
ठाकरे यांनी मोदिंच्या परदेश दौऱ्याचाही समाचार घेतला . या दौर्यातुन एकाही उद्योगपतीशी करार झाला नाही. सरकारी विमान कंपनी असताना राफेल खरेदीचे कंत्राट विमान निर्मीतीचा अनुभव नसलेल्या तसेच १ लाख २० कोटी रुपये कर्ज असलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला देण्यावरही राज यांनी संशय व्यक्त केला. राफेलची किंमत ६०० कोटी रुपये असताना १५०० ते १६०० कोटी रुपये जादा का दिले, याचा जाब आम्ही सरकारला विचारायचा नाही का, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा याना राजकीय क्षितीजावरुन दूर करा. तसेच शिवसेनेला मत म्हणजे भाजपाला मत. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराना मतदान करु नका असे आवाहन राज ठाकरे यांनी केले . भाजपा सरकारच्या काळात नोटाबंदी सारखा सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. लोकांनी आता सावध राहीले पाहिजे, असेही राज म्हणाले.