बहुजननामा ऑनलाइन टीम – : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीवरून तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात आतापासूनच आरो प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका मंत्र्यांनी ममता बनर्जी या बांगलादेशी दहशतवाद्यांच्या सूचनेनुसार सरकार चालवतात अशी टीका केली होती. आगामी निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना आता ममतांनी खडेबोल सुनावले आहेच पण भाजपाचाही त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. दरम्यान, यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. मात्र, आता त्यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पुरुलिया येथे मंगळवारी एका रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे असं म्हणत ममतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सापासोबत भाजपाची तुलना केला आहे. ज्यांची भाजपात जाण्याची इच्छा आहे ते जाऊ शकतात असं म्हमत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्यांना सुनावलं आहे.
तसेच विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपा आयटीचा वापर करत आहे. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ते व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करत असल्याचं म्हटलं आहे.
आपण रोज कपडे बदलू शकतो, विचारसरणी नाही
राजकारण ही एक आदर्श विचारसरणी आहे, तत्वज्ञान आहे. आपण रोज कपडे बदलू शकतो, विचारसरणी नाही. ज्यांना भाजपात जायचं आहे ते जाऊ शकतात, पण आम्ही त्यांच्यासमोर आपली मान झुकवणार नाही. तुम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान केलंत. पण तुमचे खासदार भेटण्यासाठी आले का? त्यांनी तुम्हाला काही दिलं का? ते निवडणुकीच्या आधी तुम्हाला खोटी आश्वासनं देतील आणि निवडणूक संपली की पळून जातील” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. यावरूनही ममता बॅनर्जी यांनी रॅलीत भाजपावर हल्लाबोल केला.
विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपकडून आयटीचा वापर
भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजप आयटीचा वापर करत आहे. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ते व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करत आहेत, असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी नंदीग्राममध्ये निवडणूक रॅली घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला असून मला नंदीग्राममधून निवडणूक लढवायची आहे, असे यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी हे आवाहन स्टेट युनिटच्या अध्यक्षांना स्टेजवरच केले आणि तेथे तातडीने याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच, तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळतील तसेच यंदाही राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
याचबरोबर, रॅलीत तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले शुभेंदु अधिकारी यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला. नंदीग्राममध्ये आंदोलन कोणी केले, यावर कोणालाही माहिती घेण्याची गरज नाही. आज शेतकरी आंदोलन करीत आहेत आणि भाजपाने तातडीने हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या