औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – औरंगाबादमध्ये एका भाजप कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, पोलिसांच्या त्रासाला कंटाळून भाजप कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येची घटना घडली होती. तर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांच्या हत्येचा प्रकार समोर आला होता.
पंकजने आत्महत्या करण्याआधी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्याने लिहिलं होतं. तर तीन पोलिसांचीही नावं या सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आली आहेत. उस्मानपुरा पोलीस स्थानकातील पीएसआय चंदन शेळके यांच्यासह इतर २ पोलिसांनी यामध्ये नावं लिहिण्यात आली आहे. अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.
आत्महत्या करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच नाव पंकज संकपाळे असे आहे. पंकज हा भाजपचा कार्यकर्ता असून तो माहिती व अधिकारामध्ये काम करायचा. याच कामाअंतर्गत त्याच्यावर काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामुळे तो खूप त्रस्त होता. त्याची न्यायलयीन लढाईदेखील सुरू होती अशी माहिती देण्यात आली आहे. पण उस्मानपुरा पोलीस स्थानकातील पोलीस त्याला त्रास देत होते. त्यांच्या जाचाला कंटाळून पंकज याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. पंकजने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळावरून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.