बहुजननामा ऑनलाइन –
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या गोपीनाथ गडावर आयोजित पंकजा मुंडेंच्या या ‘खास’ मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अनेक नेत्यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला. एवढेच नाही तर पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, असे सांगत खडसेंनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले.
परळीत गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेऊन पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ‘पक्ष माझ्या बापाचा आहे, असं मी का म्हणू नये. मी बंडखोरी का करू ? मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. मी निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले. म्हणूनच आत्मपरिक्षण करण्याचा मी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा नाही की मी भाजपवर नाराज आहे. पंकजा मुंडे भूकंप करणार. भूकंप ही काही चांगली बाब नाही. पण कुणाचीही हानी होणार नाही ,असा भूकंप करण्याचा मी प्रयत्न करेन’ असे संकेत संकेत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आधीच दिले होते.
विधानसभा निवडणुकांनतर भाजपच्या नेत्यांमध्ये खदखद आहे. पक्षावर दिग्गज नेते नाराज आहे. त्यामुळे बंडखोरीची होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. यावर भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. जे नेते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले ते आमदारदेखील आमच्या संपर्कात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
खडसेंनी सांगितले की, ‘पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही तर घडवला आहे. शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपला बहुजनांचा चेहरा देण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. मुंडेंच्या मतदारसंघात पंकजा पराभूत झाली हे दुःख आहे. पंकजाला बोलता येत नाही ती वेदना सहन करते’ ते पुढे म्हणाले की, जुन्या नेत्यांनी पक्ष सोडून जावे अशी नीती अवलंबली जात आहे. माझ्या संमतीशिवाय देवेंद्र पक्षाध्यक्ष झाले नसते. आधी माझे तिकिट कापले गेले. जास्त बोलले तर शिस्तभंग होईल, अशी धमकी देण्यात आली. एकनाथ खडसेंकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक करत असून किती दिवस सहन करायचे ? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.