मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गेल्या लोकसभा निवडणूकीला आणि २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाण सोशल मिडियाचा वापर करण्यात आला. सोशल मिडियावर एवढा भर देण्यात आला की जिथे तिथे प्रचार आणि प्रचारच दिसून येत होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षांकडून सारासार सोशल मिडियाचा वापर करण्यात आला.
त्यातच भाजपाने साकारलेला ‘रम्या’ सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करत आहे. यावेळी रम्याचे डोस या मालिकेतून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बिघडलं असून आता ते भंगारात जाणार असल्याचे सांगितले. शरद पवार आणि ईडी प्रकरण सुरु असताना अचानक अजित पवार यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला. या तडकाफडकी राजीनाम्याची कल्पना शरद पवारांना देखील नव्हती. परंतु त्यानंतर शरद पवार सांगितील तो अंतिम निर्णय असंही त्यांनी म्हटलं होतं. याच घटनेवर भाजपच्या रम्याने डोस भरला आहे.
भाजपच्या रम्याने निशाणा साधत म्हणले की, ईव्हीएम, कलम ३७० असो किंवा भगवा झेंडा, दोघांची मत परस्परां विरूद्ध. दादांनी राजीनामा सुद्धा काकांना न विचारता दिला आणि त्यांना भेटल्यावर दादा म्हणतायेत ‘काका सांगतील तो अंतिम निर्णय’ असे एक व्यक्ती रम्याशी संभाषण करताना दाखवण्यात आली आहे. त्यावर रम्याही त्यांना उत्तर देतो. अरे हे घड्याळ ना, एक फटका दिला की थोडावेळं बरोबर चालतंय. पण नंतर मिनिट काटा आणि तास काटा विरूद्ध दिशेने फिरायला लागतात. हे आता काही दुरूस्त होणार नाही, भंगारातचं जाणार.
Visit : bahujannama.com