नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – सध्या विधानसभेचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठं घमासान सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. या सर्व पार्श्वभूमीवर आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलं आहे.
‘मी ज्या पक्षातून आलोय त्या पक्षाच्या सिद्धांताची पाळंमुळंच आज उखडली जात आहेत. राज्यातही आज आपण तेच होताना पाहतोय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. एकंदरीत काँग्रेसच्या देशभरातील परिस्थितीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. हिवाळी आधिवेशनासाठी नागपुरात आलेले सर्व आमदार आज संघाच्या कार्यालयात जाणार आहेत. तिथे त्यांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरूनच भाजपने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘राम मंदिर चळवळ, स्वातंत्र्यवीर सावरकर, नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायदा, काश्मीर ३७० याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना स्पष्ट शब्दात सांगणार का ?’ असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनी उपस्थित केला.
Visit : bahujannama.com