बहुजननामा ऑनलाइन टीम : ’12 डिसेंबर’ रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण तुम्ही सारे या… हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे. तुम्ही ही या… वाट पाहते’ असे भावनिक ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेतात, खरच त्या भाजपा सोडण्याचा निर्णय घेणार का, असे प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडले आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपमध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे त्यानंतर काल झालेल्या भाजपच्या संघटनात्मक बैठकीलाही पंकजा गैरहजर होत्या. त्यामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळालं. पंकजा मुंडे यांनी 12 डिसेंबरला कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा मेळावा बोलावला आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं ट्वीट केलं आहे.
https://twitter.com/Pankajamunde/status/1204107871656513536
भाडपकडून औरंगाबादमध्ये विभागीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. परंतू या बैठकीला भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाही. या बैठकीत भाजपकडून मराठवाड्याचा जिल्हावार आढावा घेण्यात आला. जय, पराजय, तक्रारी याबाबत भाजपच्या बैठकीत चिंतन करण्यात आले. बैठकीला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. परंतू पंकजा मुंडे मात्र दिसल्या नाही. त्यामुळे वर्तुळात चर्चेला उधाण आले.
मागील ४ वर्षांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे पक्षात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमधील नाराज नेत्यांच्या बैठकीत सत्रही सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच एकनाथ खडसे हे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये राजकीय भूकंप घडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Visit : bahujannama.com