मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उत्तर देताना भाजप सरकारचा कारभार पारदर्शक असून आम्हाला चौकशांच्या धमक्या द्यायच्या नाहीत, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आकसबुद्धीने काम करत असून आम्ही पारदर्शक कारभार केल्याने त्याची आम्हाला चिंता वाटत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकारने केलेल्या कारभारावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
आम्ही पाच वर्ष अतिशय स्वच्छ कारभार केला आहे. आम्हाला चौकशीच्या धमक्या दिल्या तरी आम्ही त्या मान्य करत नाही, असेही फडणवीसांनी म्हटले. तसेच भाजप सरकारचा आणि आमच्या मंत्र्यांचा कारभार जनतेने पाहिला असून सध्याचे सरकार सूडबुद्धीने कारभार करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.