पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी हिमालयात जावे या शिवसेनेच्या सल्ल्यावर खुद्द चंद्रकांत पाटलांनी उत्तर देणे शिताफीने टाळले आहे. पण पाटील हे विनोदी विधाने करतात, या शरद पवारांच्या ( NCP President Sharad Pawar) टीकेला आणि त्यांच्या वाचळवीरांनी बडबड बंद करावी, असे म्हणत पाटील यांनी चतुराईने पलटवार केला आहे.
चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या विरुद्ध दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोनल करत आहेत. मात्र, केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द होणार नाही, अशा शब्दात पाटील यांनी पवार यांना ठणकावून सांगितले आहे. केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यावर पाटील यांनी पलटवार केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आंदराजंली अर्पण केली. ते म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा गाभा 1000 वर्षे बदलता येणार नाही असे पाटील यांनी सांगितले आहे.शरद पवार यांनी आंदोलन दिल्ली पुरते सीमित राहणार नाही. ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना एमएसपी देणारच आणि इतके दिवस ते ऑन पेपर नव्हते. आता ऑन पेपर येणार आहे. शेतमाल कुठेही विकता येणार तरी आंदोलनाचा आग्रह कशासाठी असा सवाल पाटलांनी केला आहे. गेल्यावर्षी कांदा दुप्पट निर्यात झाला. यंदा पावसामुळे उत्पादन कमी झाले. तेलबिया निर्मितीही कमी झाली. हे कांदा निर्यात बंदी, पाम तेल आयातीवर टीका करणारे का सांगत नाहीत, असे म्हणत पाटील यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
दुसरीकडे, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाच्या हजारो शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनात शिवसेनाही रस्त्यावर उतरण्याची चिन्ह दिसत आहे. अकाली दलाच्या नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील इतर दोन पक्षांनी देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट
कृषी कायदा रद्द करण्यासाठी आता शरद पवार यांनीही पुढाकार घेतला आहे. येत्या दिवसात शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.शरद पवार यांच्यासह काही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार आहे. ही भेट कृषी कायदा विरोधाच्या संदर्भात असणार आहे. कृषी कायद्याविरोधात शरद पवार हे राष्ट्रपतींकडे नवी भूमिका मांडणार असल्याची शक्यता आहे.