मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी बाकड्यावर असणाऱ्या भाजपने या सरकारवर घेराव घालण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस यांच्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पाटील म्हणाले कि, ‘जर बहुमताची खात्री असले तर, त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून का ठेवल आहे ?असा प्रश्न उपस्थित केला असून,१७० प्लस बहुमत आहे तर, आमदारांना कोंडून का ठेवलंय ? त्यांचे मोबाईल का काढून घेतलेत ? कुटंबाशी संवाद साधला जात नाही. मारून मुटकून सरकार फार दिवस चालवता येत नाही हिंमत असेल तर, गुप्त मतदान पद्धतीने विश्वास दर्शक ठराव घ्या, असं ‘ओपन चॅलेंज’ यांनी महाविकास आघाडीला दिल आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी बेकायदा असल्याचा दावा केला असून या संदर्भात राज्यपालांकडे याचिकाही दाखल होत असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. पण, ही याचिका कोणी दाखल केली हे मात्र हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच, ‘सरकारने नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे. हंगामी अध्यक्ष बदलून त्यांनी हे सिद्ध केले आहे. अध्यक्षांची निवड होऊपर्यंत राज्यपालांनी नेमलेलेच विधानसभा अध्यक्ष राहतात. आता आज विश्वास दर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्ष निवड उद्या, असं होणार आहे. विधानसभा कामकाजांचे नियम, संविधानाने केलेले कायदे त्याची पायमल्ली करायला सरकारने सुरुवात केली आहे.’ सरकारला कोणतेही नियमबाह्य काम करू देणार नाही, आम्ही प्रबळ विरोधीपक्ष म्हणून, काम करू. असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
भाजपने मुरबाडचे आमदार किसन कथोरे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच ‘मोठ्या मनाने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. पण, राज्यपालांनी अनेकदा सांगूनही चुकीच्या पद्धतीने शपथ घेण्यात आली. हा शपथविधी बेकायदेशीर आहे. आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर आहे. पण, पदाची शपथ फॉर्मेटमध्येच घ्यावी लागते. यासंदर्भात राज्यपालांकडे याचिका दाखल होत आहे. त्यांनी न्याय दिला नाही तर, सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल होऊ शकते.’
Visit : bahujannama.com