मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाईटलाईफ सुरु करण्याची घोषणा झाली. त्यानंतर २६ जानेवारीपासून नाईटलाईफला सुरवातही झाली मात्र त्याला मुंबईकरांनी फारसा प्रातिसाद दिला नाही. त्यावरूनच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी ‘ मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरावायचे का’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरावायचे का ?
नाईटलाईफची घोषणा झाल्यापासूनच विरोधी पक्षाकडून वारंवार टीका करण्यात येत आहेत. नाईटलाईफला मुंबईकरांनी दिलेला अल्प प्रतिसाद पाहून आता भाजपचे आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, पोलिसांची तयारी नसतानाही नाइटलाइफचा निर्णय लादला आहे. मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरावायचे का ? अशा स्वरूपाचे ट्विट त्यांनी केले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
नाईट लाइफला मुंबईकरांचा अल्प प्रतिसाद
पहिल्या दिवशी नाइटलाइफला मुंबकरांनी अल्प प्रतिसाद दिला. हॉटेल आणि मॉल रात्री 3 वाजता बंद करण्यात आले, तसेच काही ठिकाणी तर रात्री १२ नंतरच ऑर्डर घेणे बंद करण्यात आले होते. अनेक मॉल चालकांनी अद्याप निर्णय घेतलाच नाही. दरम्यान, वीकेंडला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा हॉटेल आणि मॉलचालकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईत नाइटलाइफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.