नवी दिल्ली : वृत्तसंस्था – “नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही”, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हंटलं होत. त्यांच्या याच विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली “हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का ?, असा घणाघात आशिष शेलारांनी केलाय.
शेलार यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केलीय अशी टीका करणं हे तुम्हाला शोभत नाही. मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही असंही त्यांनी म्हटलंय.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय विद्यार्थी चळवळ दशा आणि दिशा या विषयावर बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
उद्धव च्या बापाचे राज्य आहे का … असे जाहीर निवेदन करणे @ShelarAshish ह्यांना शोभत नाही ..
आणि होय
मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे …
आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2020
आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की, रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल”, असे टीकास्त्र शेलारांनी सोडलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण ? गृह मंत्री कुणाचे ? असे असतानाही राज्यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठा कट रचला जात आहे. आणि हा कट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजूबाजूला फिरत आहे”, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला.