बहुजननामा ऑनलाईन – सोमवारी कलम ३७० हटवल्यानंतर सभागृहात चर्चेदरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयाचे भाजप खासदार विजय गोयल यांनी कौतुक केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत अशा शब्दात मोदींची स्तुती केली. कलम ३७० हटवणे हे एक धाडसी निर्णय आहे. या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनसंघाचे श्यामा प्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विजय गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने वाईट शक्तींविरोधात लढाई केली होती. त्याच पद्धतीने नरेंद्र मोदीही दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करत आहेत.
सोमवारी राज्यसभेत कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आले. तर सरकारने जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेतला. राज्याचा विकास ३७० मुळेच होऊ शकत नाही आणि दहशतवाद्यांना करणीभूतही हाच कलम असल्याने असा धाडसी निर्णय घ्यावा लागला असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच या निर्णयामुळे राज्यातील स्थिती सर्वसामान्य होईल आणि काश्मीरचा विकासही केला जाईल असेही त्यांनी सांगितले.