बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यभरात दौरा करत कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. फडणवीसांनी राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा आणि कोरोना मुद्द्यावर इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातच बसावे. तसेच फडणवीस यांनी नागपुरातच राहून चार-पाच कोविड सेंटर उभारावेत असा सल्ला आंबेडकरांनी फडणवीसांना दिला होता. दरम्यान त्यांच्या या सल्ल्यावर फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही.
तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे! माध्यमांशी संवाद…https://t.co/pqcwVxvC6P#CycloneTauktae #MumbaiRains pic.twitter.com/S67ql7cj8D— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 17, 2021
कोपरगाव येथील आत्मा मालिक ज्ञानपीठच्या संजीवनी कोविड केअर सेंटरच्या उद्धघाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आंबेडकरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मी आधीच हे सुरु केल आहे. पण त्यांना याची माहिती नसावी. नागपूरमध्ये जे काही काम करायचे होते ते केले आहे. नागपुरला ऑक्सिजनची गरज होती, तो देखील आणला आहे. वेगवेगळ्या रुग्णवाहिका तसेच सेवा सुरु केेल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना माहिती नसावे. त्यामुळे ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू असे फडणवीस म्हणाले.