मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – “पाडून दाखवा सरकारचे” हे मंत्री आहे की भांडखोर सासूबाई’ अशा शब्दांत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे न सोडण्यात आल्याने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच शेलार यांनी ‘ई’ पासच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरलं होत.
आशिष शेलार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले “कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल्य या राज्यातील “पाडून दाखवा सरकारकडे” आहे. कोकणात रेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरु आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाही. चाकरमान्यांना त्रास दिला.”
आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले.. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत.
"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?
(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 13, 2020
“आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागते.. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू-मै-मै करीत बसलेत. “पाडून दाखवा सरकारचे” हे मंत्री आहेत की, भांडखोर सासूबाई?” असे सुद्धा शेलार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून आशिष शेलार सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे.