नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिजर्व बँकेने लोकांना बँकेत रक्कम जमा करण्यासंदर्भात कोणताही धोका नसल्याचे आश्वासन दिले आहे. आपल्या ट्विटरवरून आरबीआयने रिजर्व बँकेची नजर सगळ्या बँकांवर आहे. बँकेत लोकांच्या ठेवीला कोणताही धोका नाही, असे म्हटले आहे. केंद्रीय बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आरबीआय सगळ्या बँकांवर बारीक नजर ठेवत आहे. ठेवीदारांना आश्वासन दिले जाते की, कोणत्याही बँकेतील ठेवीवर धोका नाहीये.’
पीएमसी बँकेच्या दिवाळखोरीमुळे आणि आता येस बँकवर आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे लोकांना बँकेतील त्यांच्या ठेवींबाबत चिंता वाढली होती. आरबीआयने लोकांच्या या प्रकारच्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न ट्विटर माध्यमातून केला आहे. आरबीआयने आणखी एक ट्विट केले असून त्यात मीडियाकडून बँकेतील ठेवीबाबत सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्याविषयी बोलले आहे.
RBI closely monitors all the banks and hereby assures all depositors that there is no such concern of safety of their deposits in any bank. (2/2)
— ReserveBankOfIndia (@RBI) March 8, 2020
आरबीआयने लिहिले आहे की, ‘माध्यमांच्या काही घटकांनी विविध बँकांमधील ठेवींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे, या चिंता विश्लेषणावर आधारित आहेत, ज्या सदोष आहेत. बँकांचे सॉल्व्हेंसी आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅपिटल नाही तर टू रिस्क वेटेड ऍसेट्स (CRAR) वर आधारित असून मार्केट कॅपवर नाही.’