नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठ्या एसबीआय बँकेने बुधवारी आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली असून सगळ्या प्रकारच्या बचत खात्यांवर सरासरी मासिक शिल्लकची अनिवार्यता दूर केली आहे. बँकेकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांना अडचणमुक्त बँकिंग सेवा उपलब्ध करण्यासाठी आणि देशात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. एसबीआयच्या या निर्णया मुळे ४४.५१ कोटी ग्राहकांना फायदा झाला असून यावेळी मेट्रो, सेमी अर्बन आणि ग्रामीण भागात क्रमशः ३०००, २००० आणि १००० रु.ची किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. भारतीय स्टेट बँक मासिक शिल्लक न राखल्यास ग्राहकांना दंड आकारणार आहे.
चेअरमननुसार बँकेतील ग्राहकांचा विश्वास वाढेल
ही घोषणा करताना एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी म्हटले की, “या घोषणेपासून आमच्या मौल्यवान ग्राहकांचे हास्य आणखी वाढेल. AMB ला माफ करणे हे बँकेचे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल आहे, जे ग्राहकांना अधिक सोयीस्कर आणि जास्त चांगल्या बँकिंग अनुभवासाठी उचलले गेले आहे. आम्हाला विश्वास आहे की या पाऊलामुळे आमच्या ग्राहकांना एसबीआय आणि बँकेशी दृढ मार्गाने संपर्क साधण्यास मदत होईल आणि एसबीआयवरील त्यांचा विश्वास आणखी मजबूत होईल. ”
SMS चार्जेसही माफ
बँकेने म्हटले की, ‘कस्टमर फर्स्ट’ दृष्टिकोन लक्षात घेऊन एसएमएस चार्जही माफ केले आहेत. या पाऊलामुळे बँकेच्या सगळ्या ग्राहकांचा उल्लेखनीय फायदा होईल.
ऍसेट, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचार्यांच्या बाबतीत स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत बँकेकडे ३१ लाख कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत. याआधी बँकेने एमसीएलआर आधारित व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. यासह एसबीआयनेही मुदत ठेवीवरील व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली होती.