बहुजननामा ऑनलाइन टीम – नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचं भाजपचं राजकारण आहे, हे राजकारण यशस्वी होताना दिसत आहे, सध्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या(Bihar Election ) मतमोजणीतील कल पाहता एनडीए पुढं जाण्याची शक्यता आहे. परंतु त्या बाबत आताच निष्कर्ष लावता येणार नाही. काँग्रेसला 27 च्या आसपास जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. ते होताना दिसत नाही. असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र त्यात यश येत नाही. आमची अपेक्षा मागील जागांपेक्षा जास्त जागा मिळतील अशी होती. नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्यासाठी लोजपाला वेगळ लढायला भाग पाडलं. काँग्रेस हा राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. निवडणूक प्रक्रियेत पक्षपातीपणा नको, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
बिहारच्या निवडणुकीत(Bihar Election ) चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला जास्त जागा मिळवण्याची शक्यता कमी आहे. सभा या वातावरणनिर्मिती घेतल्या जातात. राजकारण बदलेलं आहे. मोठ्या सभा झाल्यातरी लोकं आकर्षित होतात असे नाही. आघाडी करुन लढतो तेव्हा स्थानिक लोकांचा निर्णय असतो. 75 टक्के मतांची मोजणी व्हायची आहे. यानंतर सप्ष्टपणे बोलता येईल, असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. दरम्यान, भाजप नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं जोरदार उसळी मारली आहे.एनडीए सध्या 128 जागांवर असून आघाडीवर आहे. महागठबंधन सध्या 104 जागांवर आघाडीवर आहे.
रात्री उशिरापर्यंत चालणार मतमोजणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या जवळपास 30 हजारांनी वाढवण्यात आली होती. निकाल स्पष्ट होण्यास आणखी सहा ते सात तासांचा अवधी लागू शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या संथ वेग आहे. परिणामी दुपारी 12 वाजेपर्यंत साधारण 20 टक्केच मतांची मोजणी होऊ शकली. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 कोटी मतांची मोजणी अजून बाकी आहे.