सातारा : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणूक सर्वांच्या केंद्रस्थानी होती. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात हि लढाई होती. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार उदयनराजे ३२००० मतांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे साताऱ्यातील आपला गड राष्ट्रवादी कायम ठेवणार असल्याचं चित्र दिसून आलं आहे. श्रीनिवास पाटील हे साताऱ्यात आघाडीवर आहेत.
उदयनराजे यांच्या पिछाडीचे कारण त्यांचे पक्षांतराचा निर्णय असल्याचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या ३ महिन्यात उदयनराजे यांनी खासदार पदाचा राजीनामा देत भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे साताऱ्यातील जनतेने नाराजी व्यक्त केली असून मिळालेल्या आकेडवारीनुसार साताऱ्यातून उदयराजे भोसले हे पराभवाच्या छायेत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान शरद पवार यांच्या प्रचारामुळे देखील श्रीनिवास पाटील यांना आघाडी मिळाली असल्याची चर्चा केली जात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा मतदारसंघ राष्ट्रवादी राखणार असल्याचे दिसून येत आहे.
Visit : bahujannama.com