भोपाल : वृत्तसंस्था – वेगळ्या बुंदेलखंडानंतर विंध्य प्रदेश स्थापनेच्या मागणीला जोर आला आहे. सतनातील मैहरचे भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी यांनी रेवा, सिधी, सतना, सिंगरौली, शहडोल, जबलपूर यांना एकत्र करून वेगळ्या विंध्या प्रदेशाची मागणी केली आहे.
याबाबत भाजपच्या आमदाराने सीएम कमलनाथ यांच्यासह पंतप्रधान मोदी यांना देखील पत्र लिहिले आहे. भाजप आमदाराचे म्हणणे आहे की, भाजप आणि कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधींनी विंध्यला स्वतंत्र राज्य घोषित करावे. याला जो कोणी विरोध करेल त्याच्यावर स्थानिक स्तरावर बहिष्कार टाकला जाईल.
विंध्यामोत्सवामध्ये घेतला जाणार निर्णय
ते म्हणाले की, विंध्य महोत्सवाच्या काळात विंध्यचा मागासलेपणा दूर करण्यासाठी नवीन राज्य उभारणीबाबत चर्चा केली जाईल. येत्या दोन महिन्यांत या मागणीवर मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल. मात्र, नारायण त्रिपाठी यांच्या विंध्या राज्य करावे, या मागणीवर भाजपने मौन बाळगले आहे. त्याचवेळी कॉंग्रेस सरकारचे मंत्रीदेखील या प्रकरणात लक्ष देण्याच्या मन: स्थितीत दिसले नाहीत. विंध्यचे मंत्री कमलेश्वर पटेल म्हणाले की, राज्यात विकासासाठी अजून बरेच काही बाकी आहे आणि अशा परिस्थितीत या मागणीला अर्थ नाही.
मंत्री पीसी शर्मा म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. या संदर्भातील निर्णय उच्च स्तरावर आहे. वास्तविक, विंध्य प्रदेशची स्थापना 1948 मध्ये झाली होती. ज्याची राजधानी रेवा होती. 1956 मध्ये मध्य प्रदेशच्या स्थापनेत विंध्याचा राज्यात समावेश होता, पण आता पुन्हा एकदा वेगळा विंध्य प्रदेश बनविण्याच्या मागणीने जोर धरला आहे.