नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – भीम आर्मीने 22 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळ्याव्यामध्ये कोतवाली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे भीम आर्मीकडून न्यायालयात धाव घेतली असता पोलीस आणि राज्य सरकारने भीम आर्मी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा जुळत असल्यामुळे मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आल्याचे म्हंटले आहे.
भीम आर्मी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मिळती-जुळती असल्याचे प्रतिज्ञापंत्र पोलिस आणि राज्य सरकारने नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. भीम आर्मी आणि संघाची विचारधारा जुळत असल्यामुळे भीम आर्मीच्या मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आल्याचेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. भीम आर्मीचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी ही याचिका दाखल केली होती. संघाच्या हेडगेवार स्मारकाच्या शेजारच्या रेशीमबाग मैदानावर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझादही उपस्थित राहणार आहे.
या मेळाव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कारण देऊन पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. त्यावर कोर्टाने 20 फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश कोर्टाने पोलीस आयुक्तांना बजावले होते. त्याला उत्तर देताना पोलीस आणि राज्य सरकारने हे प्रतिज्ञापत्रं दाखल केले आहे. दरम्यान, दुपारनंतर भीम आर्मीच्यावतीने कोर्टात युक्तिवाद केला जाणार असून कोर्ट काय निर्णय देईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.