नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे. काही लोक मुदत ठेवींच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँकांमध्ये गुंतवणूक करतात तर काही लोक म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात. आता या योजनांमध्ये कुठे जोखीम अधिक आहे तर कुठे नफा कमी आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला सरकारने सुरू केलेल्या नव्या योजनेबद्दल सांगत आहोत. सरकारची नवीन योजना भारत बॉन्ड ईटीएफचा दुसरा हप्ता 14 जुलै रोजी सब्सक्रिप्शन साठी खुला होईल. या माध्यमातून सरकारची 14,000 कोटी रुपयांची उभारणी करण्याची योजना आहे.
हा देशातील पहिला कॉर्पोरेट बाँड एक्सचेंज ट्रेड फंड (ईटीएफ) आहे. यात किमान युनिट 1,000 रुपयांची आहे. यासाठीची सदस्यता 17 जुलै रोजी बंद होईल. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये भारत बॉन्ड ईटीएफची सीरिज सादर केली गेली होती. या माध्यमातून 12,400 कोटी रुपये उभे केले गेले. इतर म्युच्युअल फंडांच्या तुलनेत ईटीएफसाठी खर्च प्रमाण देखील कमी आहे. हे केवळ 0.005 टक्के आहे. स्थिरता आणि रिटर्नचा अंदाज याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यात सुरक्षिततेसह पारदर्शकता आहे. कमी कर याला अधिक आकर्षक बनवतो.
भारत बॉन्ड ईटीएफचे वैशिष्ट्य –
– ते कोणत्याही सीपीएसई, सीपीएसयू, सीपीएफआय किंवा कोणत्याही सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करेल.
– रोख्यांची खरेदी एक्सचेंजवर करता येते.
– किमान युनिट आकार 1000 रुपये आहे.
– पारदर्शक पोर्टफोलिओ (वेबसाइटवरील दैनिक तपशील)
– प्रत्येक ईटीएफची निश्चित मुदतपूर्तीची तारीख असेल.
– दोन्ही नवीन सीरीज एप्रिल 2025 आणि एप्रिल 2031 मध्ये मॅच्योर होतील.
भारत ईटीएफ बाँडबद्दल सर्व काही जाणून घ्या
– भारत बॉन्ड ईटीएफ सिंपल फिक्स्ड इनकम प्रोडक्ट आहे. येथे सरासरी गुंतवणूकदार आपल्या पैशाला पूर्ण आत्मविश्वासाने ठेवू शकतो. त्याच्या परताव्याचा अंदाज घेणे सोपे आहे. यातून मिळणारे उत्पन्न करमुक्त तर नाही, पण त्यास इंडेक्सेशनचा लाभ मिळेल.
– भारत बाँड ईटीएफची दुसरी खेप 14 जुलै रोजी सुरू होणार आहे. त्याचा पूर्ण आकार 14 हजार कोटी रुपये आहे. ही खेप 17 जुलै रोजी बंद होईल. हे एडलविस मालमत्ता व्यवस्थापन द्वारे व्यवस्थापित केले जाईल.
– दुसऱ्या शब्दांत रिटर्नमध्ये चलनवाढ समायोजित केली जाईल. किरकोळ गुंतवणूकदार नवीन फंडात 1,000 रुपयांमधून गुंतवणूक सुरू करू शकतात. ज्या गुंतवणूकदारांकडे डीमॅट नाही ते फंड्स ऑफ फंड्स योजनेद्वारे गुंतवणूक करु शकतात.
पैसे किती वर्षांत दुप्पट होतील
समजा जर आपण 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यावर 7.58 टक्के परतावा मिळाला तर 10 वर्षांत आपले पैसे वाढून 2,07,642 रुपये होतील. त्यानंतर तुम्हाला कर म्हणून 7,836 रुपये द्यावे लागतील. या प्रकरणात, आपल्याला 1,99,806 रुपये मिळतील. म्हणूनच एक्सपर्ट्स भारत बॉन्ड ईटीएफ दीर्घ मुदतीत कराच्या बाबतीत अधिक फायदेशीर आहेत. कंझर्व्हेटिव्ह डेट फंड गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.