मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचार्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बेमुदत बंद पुकारला होता. बेस्टचे कर्मचारी ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करून कामावर रुजू होणार नसल्यचेही सांगण्यात आले होते. परंतु महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आदोलन मागे घेण्यात आले आहे.
कोरोनामुळे कर्मचार्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवांच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचार्यांना पत्रा पाठवत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर 60 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. ‘बेस्ट’ उपक्रमातील जवळपास 100 पेक्षा अधिक कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधित झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची आसपासच्या शहरांतून आणि मुंबईतून ने-आण करत असताना या कर्मचार्यांना लागण झाल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.
बेस्ट कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यावर त्याचे आणि संपर्कात आलेल्या सहकार्यांचे विलगीकरण करण्यात यावे, प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची करोना चाचणी रोज करण्यात यावी, बेस्ट कर्मचार्यांची ने आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्रा बसगाड्या सुरू कराव्यात, कोरोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचार्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे अशा उपक्रमाकडे मागण्या करण्यात आल्या होत्या.