बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील अशा दोन शहरातील अशी घटना समोर आली आहे. जे ऐकून सगळेच अचंबित झाले आहेत. शिक्षणामुळे महाराष्ट्र पुरोगामी झाला आणि सुधारला देखील असे म्हंटले जाते तर दुसरीकडे अशा घटनांमुळे महाराष्ट्र खरच पुरोगामी झाला का असा प्रश्नही निर्माण होतो. ही घटना मराठवाड्यातून आहे. यामध्ये एक प्रकार बीडमधील असून दुसरा लातूर जिल्ह्यातील आहे.
एकविसाव्यांदा बीडमध्ये महिला बाळंत होणार
बीडच्या माजलगावपासून दोन किलोमीटर अंतरावर केसापुरी वसाहतीत राहणारी एक महिला तब्बल एकविसाव्यांदा बाळंत होणार आहे. या महिलेचे नाव लंकाबाई खरात आहे. या प्रकरणी माहिती आरोग्य विभागाला मिळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी चक्रावून गेले आणि त्या महिलेची रवानगी सरकारी रुग्णालयात करण्यात आली. या महिलेला या आधीच ९ मुली आणि २ मुले आहेत. तर ९ अपत्ये हे बाळंतपणानंतर दगावली होती. तर आता बाळंतपणाची तिची एकविसावी वेळ आहे. महिलेची याआधीची २० बाळांत घरीच झाली होती. मात्र एकविसावी प्रसूती पहिल्यांदाच रुग्णालयात होणार आहे.
आजही लातूरमध्ये महिलांची १०- १२ बाळंपतपणं
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अन्सर वाडीत आजही अनेक महिलांची १० ते १२ बाळंतपणं सहज होतात. या गावात गोपाळ समाज राहतो. अशा या समाजात असंख्य अश्या महिला आहेत ज्यांना किमान पंधरा ते वीस मुले आहेत. एवढ्या मुलांची नावे काय ठेवायची म्हणून या लोकांनी मुलांची नावे भाकरी, भाजी, गांजा, दारू, बंदूक, गोळी, सुपारी अशी ठेवली आहे.