मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे आता कोरोना व्हायरसचा प्रभाव क्रिकेट विश्वावर देखील पाहायला मिळत आहे कारण, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आशियाई संघात खेळली जाणारी टी- २० स्पर्धा रद्द केली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ही माहिती दिली. बीसीबी प्रमुख नजमुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हे सामने स्थगित करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हे सामने रद्द केले गेले आहेत.
आशिया आणि वर्ल्ड इलेव्हेन या दोन्ही स्पर्धांमध्ये २१ व २२ मार्च रोजी टी-२० सामने खेळवले जाणार होते, आता हे सामने रद्द करण्यात आले असून, जगभरात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता अनेक स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएल ची स्पर्धा सुद्धा आता कोरोना मुळे संकटात सापडली आहे. आयपीएलवर बंदी घालावी म्हणून मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ही स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएल बाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसने भारतात सुद्धा आपले हात-पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून ६५ च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेलेल आतापर्यंत ११ रुग्ण आढळले असून, चीन पाठोपाठ आता १०० देशांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसाही बंद करण्यात आलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून लागू होणार आहे, यासोबतच चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून १५ फेब्रुवारीनंतर येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येणार आहे. कोरोना चा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्वाचा निणर्य घेतला आहे.