मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेकांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत आदरांजली वाहिली. बाळासाहेबांनी स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश दिला असे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या ट्वीटबाबत चारल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला धरेवर धरले आहे. ‘शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. स्वाभिमान, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व याला उत्तर दिलं जाईल. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे.’ असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, १९ नोव्हेंबरला संजय राऊत सोनिया गांधी, अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तास्थापनेबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. मात्र तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळॆ असल्याने या पक्षाच्या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा अंतिम अहवाल तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आला असून चर्चा करुन नंतर अंतिम निर्णय ठरणार असल्याचे म्हंटले जात आहे.