बहुजननामा ऑनलाइन टीम – बागपत : उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये कृषी कायद्यांविरोधात मागील 40 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी बुधवारी रात्री बंद पाडले. डीएम आणि एसपींच्या निर्देशात आंदोलनस्थळ रिकामे करण्यासाठी पोहचलेल्या अनेक पोलीस ठाण्यांच्या फोर्सने बळाचा वापर करत आंदोलन स्थळावरील शेतकर्यांना बाहेर काढले. नॅशनल हायवे 709 बी वर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात शेकडो लोक बसले होते, ज्यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून बाहेर काढले आणि घरी पाठवले.
एडीएम बागपत अमित कुमार यांच्या माहितीनुसार, या शेतकर्यांनी मागील अनेक दिवसांपासून नॅशनल हायवेची एक साईड जाम केली होती. एनएचआयने हायवे रिकामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्या पत्रावर कारवाई करत पोलीस प्रशासनाने हायवे रिकामा केला आहे.
40 दिवसांपासून सुरू होते धरणे
बागपतच्या बडौतमध्ये मागील 40 दिवसांपासून नॅशनल हायवे 709बी वर किसान युनियन आणि खाप चौधरींचे धरणे सुरू होते. जिल्हा प्रशासनाने अनेकदा चर्चा करून धरणे संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. आज एसपी बागपत अभिषेक कुमार आणि डीएम राजकमल यादव यांच्या नेतृत्वात मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी पोहचला आणि बळाचा वापर करत शेतकर्यांचे आंदोलन संपवले. या दरम्यान हायवेवर बांधलेला शेतकर्यांचा तंबू तोडण्यात आला आणि आंदोलनस्थळी ठेवलेले सामान ट्रॅक्टरमध्ये भरून परत पाठवण्यात आले. शेतकर्यांचे धरणे जेव्हा पोलिसांनी संपवले तेव्हा डीएम, एसपी, एडीएम, एसपीसह तमाम अधिकारी आणि अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस दल उपस्थित होते.