नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवाद प्रकरणी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे आज निकालाची तारिख कळणार असल्याचे स्पष्ट आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरन्यायाधीश कुणाचे ऐकणार नाहीत. या प्रकरणी सुनावणी आजच पूर्ण होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले.
रंजन गोगोई म्हणाले, ‘पुरे झाले आता, सुनावणी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण होईल.’ विजेत्याच्या भूमिकेतील बाबराने अयोध्येतील राममंदिराच्या जागी मशीद उभारून ऐतिहासिक चूक केली होती, ही चूक आता दुरुस्त करणे गरजेचे असल्याची भूमिका हिंदू पक्षकारांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटना पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे.
Chief Justice of India (CJI) Ranjan Gogoi while dismissing intervention application of one of the parties Hindu Maha Sabha in #Ayodhya land case: This matter is going to be over by 5 pm today. Enough is enough. https://t.co/wOxgLGEoWB
— ANI (@ANI) October 16, 2019
आजचा सुनावणीचा ४० वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली असून, सर्व पक्षकारांना १७ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. नोव्हेंबर महिन्यात अंतिम निकाल येण्याच्या शक्यता आहे.
Visit : bahujannama.com