बहुजननामा ऑनलाईन टीम : संभाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे स्थान आहे हे आपणांस माहित आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठा चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो किंवा केंद्रिय रवीशंकर प्रसाद असो. त्या दोन्ही वेळी शिवभक्तांची बाजू देत जाब विचारत होता मात्र, यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे आणि कोल्हापुरातील ‘शिवाजी विद्यापीठासहित’ महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे करणे अशी मागणी भाजपा खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) बाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. pic.twitter.com/4N0ClxDFwg
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2019
तसेच सुरुवात आपण सर्व सार्वजनिक स्थळांचे नामविस्तार करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव केवळ शिवाजी असे आहे, अशी मागणी संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाकरिता जनता रस्त्यावर उतरुन लढली. त्यात अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक आंदोलकांवर विनाकारण गुन्हे नोंदवले गेले आहे. याबाबत गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारता मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचचले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदाराने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील दलिवांवरील गुन्हेही माफ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर केली जात होती. याबाबतचे पत्रच प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. आता मराठा आरक्षणातील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी देखील संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मागणी केली आहे.
Visit : bahujannama.com