औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या मराठवाड्यात बुधवारी (दि. 9) रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात ही घटना घडली आहे. तर याच तालुक्यात वीज पडल्याने 10 शेळ्या तर 2 गायी दगावला आहेत.
औरंगाबाद Aurangabad जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये रात्री वादळी वारा अन् विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक गाव शिवारात पावसाचे पाणी आले होते. फुलंब्री तालुक्यात वीज कोसळल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच याच तालुक्यात 2 दुचाकीस्वार पुलावरून वाहून गेेले होते. मात्र त्यांना गावकऱ्यांनी वाचवले. गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात आजही ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कृपया हे देखील वाचा:
Indian Cricketers Match Fee | काय सांगता ! होय, भारतीय क्रिकेटर तासाला कमावतात एक लाख, ‘हे’ काम केल्यास मिळते मोठी रक्कम अन् बोनस वेगळा
इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 94 हजार नवे पॉझिटिव्ह, एका दिवसात सर्वात जास्त मृत्यू
पुण्याच्या चतुःश्रृंगी, खडकी आणि हडपसर परिसरातील 3 फ्लॅट फोडले, चोरट्यांकडून 8 लाखाचा ऐवज लंपास