औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असून या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याची योजना औरंगाबाद शहरापासून करावी, तसेच औरंगाबाद विमानतळावरून दिल्ली आणि मुंबईसाठी विमान सेवा लवकरात लवकर सुरू करावी. अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते.
औरंगाबादचे नवनियुक्त खासदार जलील यांनी विमान सेवेचा मुद्दा शू्न्य प्रहरात उपस्थित केला. लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या भाषणात पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याची घोषणा केली. त्यावेळी खासदार जलील या योजनेची सुरुवात औरंगाबादेतून करावी. या आधी जेट एअरवेज बंद पडल्याचा सर्वाधिक फटका औरंगाबादला बसला आहे.
औरंगाबादहून दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन विमाने बंद झाल्याने जगभरातून येणारे पर्यटक, तसेच उद्योजकांची गैरसोय होत आहे. पर्यटन, उद्योग, हॉटेल, ट्रान्सपोर्ट व्यवसायावर याचा प्रतिकुल परिणाम होत आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेली अजिंठा आणि वेरूळ हे पर्यटनस्थळे औरंगाबादपासून शंभर किलोमीटरच्या आत आहे, तसेच औरंगाबाद हे औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे शहर असल्याने येथील विमान सेवेबाबत विचार करावा, अशी विनंती जलील यांनी केली आहे. याआधी दिल्ली-जयपूर-उदयपूर-औरंगाबाद-मुंबई शहरे जोडणारी विमान सेवा सुरू होती, त्यामुळे जगभरातून या ठिकाणी पर्यटक येत असल्यामुळे शहराची भरभराट झाली. कालांतराने ही विमान सेवा बंद पडल्याने पर्यटन व्यवसायाला घरघर लागली. त्यामुळे या मार्गावर एअर इंडियामार्फत सेवा द्यावी