मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उषा राणी या भारताच्या महिला कबड्डीपटूवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बंगळुरू येथे घडली आहे. उषा ही मुळची कर्नाटकची असून हा हल्ला कर्नाटक कबड्डी संघटनेच्या पदाधिकार्यांनी केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त समजताच क्रिडा जगतात खळबळ उडाली आहे. मागील आशियाई स्पर्धेत भारतीय संघात ती खेळली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले होते.
कर्नाटकची स्टार कबड्डीपटू उषा राणीवर झालेल्या हल्ल्याने क्रिडा जगतात खळबळ उडाली आहे. त्यातच कबड्डी संघटनेच्या पदाधिकार्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त असल्याने आर्श्च व्यक्त होत आहे. बंगळुरु येथे झालेल्या या हल्ल्याप्रकरणी कर्नाटक कबड्डी संघटनेच्या तीन पदाधिकार्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सचिव मणीराजू, माजी कबड्डीपटू बी.सी. रमेश आणि नरसिंहा अशी या तिघांची नावे आहेत.
कर्नाटक कबड्डी संघटनेमध्ये उषा राणी ही वरिष्ठांची कनिष्ठ खेळाडूंबरोबर ओळख करून देत होती. उषाचे वरिष्ठ हे पोलीस खात्यामध्ये कामाला आहेत. त्यानंतर मणीराजू, बी.सी. रमेश आणि नरसिंहा यांनी उषावर प्राणघातक हल्ला केला. या तिघांवर भादवी कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या तिघांनाही जामीन मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.
Visit : bahujannama.com