चेन्नई : बहुजननामा ऑनलाईन – नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असं वक्तव्य वक्तव्य करणारे मक्कल निधी मयम पक्षाचे प्रमुख अभिनेते कमल हसन यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे.त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठली होती. गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान, कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले.
तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे कमल हसन यांचे भाषण होते ते आटोपल्यानंतर येताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावर पतिक्रिया देत हसन म्हणाले कि, आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. पण अशा घटनांमुळे आपण घाबरणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे. हसन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर कमल हसन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, ”आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे असे मला वाटते. मात्र असा प्रकारांमुळे मी घाबरलेलो नाही. प्रत्येक धर्मात त्यांचे स्वत:चे दहशतवादी आहेत. आम्ही खूप पवित्र आहोत असा दावा कुठलाही धर्म करू शकत नाही. प्रत्येक धर्मात अतिरेकी होते हे इतिहास सांगतो.”
Kamal Haasan on stones thrown at his rally in Trichy: I feel the quality of polity is going down. I don't feel threatened. Every religion has their own terrorist, we cannot claim that we are sanctimonious. History shows that all religions have their extremists. #Chennai pic.twitter.com/R7buqXnUBU
— ANI (@ANI) May 17, 2019