बहुजननामा ऑनलाईन – एटीएम मध्ये होणारे मोठ्या प्रमाणात घोटाळे तसेच फसवणूक दूर करण्यासाठी त्यावर आळा बसण्यासाठी नागरिकांची यामुळे फसवणूक रोखण्यासाठी दिल्ली स्टेट लेवल बॅंकर्स कमिटीने काही उपाय समोर आणले आहेत. या उपायांच्या माध्यमातून लोकांची एटीएमद्वारे फसवणूकांवर आळा बसणार आहे. यावर आता असा उपाय सुचवला आहे की, जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढले असतील तर आता सहा ते बारा तासांच्या अवधी नंतर पुन्हा तुम्हाला त्या एटीएम मधून पैसे काढता येणार आहे.
रात्रीच्या वेळी एटीएम मधून सर्वात जास्त फसवणूक होत असते. यामुळे ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स चे एमडी आणि सीईओ मुकेश कुमार जैन यांनी याविषयी बोलताना सांगितले, व्यवहाराच्या वेळा वाढवून अशा फसवणुकीना आळा घालू शकतो. या मागणीसाठी मागील महिन्यात 18 बँकांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली होती, त्यानंतर आता हा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला असून जर याला मान्यता मिळाली तर यापुढे एकाच वेळी दोन ट्रांजेक्शन करता येणार नाहीत. एका ट्रांजेक्शन नंतर मधल्या काळात सहा ते बारा तासांच्या अवधी नंतर पुन्हा एकदा ट्रांजेक्शन करता येईल.
२०१८- १९ दरम्यान फसवणुकीत जास्त वाढ
फसवणुकीच्या प्रकारांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात दरम्यान वाढ झाली असून दिल्लीमध्ये १७९ प्रकार उघडकीस आले आहेत. तर महाराष्ट्रात २३३ घटना समोर आल्या आहेत. यामध्ये फसवणूक झालेले विदेशी नागरिकांच्या एटीएम कार्डचे क्लोनिंगच्या घटना समोर आल्या आहेत. या उपायांबरोबरच अनेक उपाय सुचविण्यात आले आहेत. जर तुम्हाला नकळत तुमच्या खात्यातून पैसे कोणी काढत असेल तर तुम्हाला अलर्ट करण्यासाठी एक ओटीपी पाठविला जाईल त्यामुळे तुम्हाला फसवणूक होण्यापासून सावधगिरी बाळगत येते. याशिवाय बँक एटीएम साठी सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टिम वर ही चर्चा करण्यात आली. याआधी अनेक बँकांकडे ही पद्धत असून प्रत्येक बँकेने ही सिस्टीम वापरल्यास ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे एटीएमच्या माध्यमातून होणारी फसवणूकही थांबवता येणार आहे.