नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय नागरी नोंदणीच्या अंतिम यादीचा सर्व डेटा अधिकृत वेबसाइटवरून ऑफलाइन झाला आहे. विप्रो आयटी कंपनीबरोबर कराराचे नूतनीकरण न होणे हे यामागील कारण आहे. विरोधी कॉंग्रेसने यासंदर्भात यास ‘दुर्भावनापूर्ण घटना’ म्हटले आहे. त्याचवेळी केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की एनआरसीचा सर्व डेटा सुरक्षित आहे आणि कोणालाही काळजी करण्याची गरज नाही.
एनआरसीची अंतिम यादी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित झाल्यानंतर वास्तविक भारतीय नागरिकांची नावे समाविष्ट करणे आणि वगळण्याचे संपूर्ण तपशील www.nrcassam.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले गेले. हा डेटा गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे, विशेषत: नावे रद्द करण्याचे प्रमाणपत्र अद्याप त्यांना देण्यात आले नसल्याने त्यांना भिती वाटत आहे.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, एनआरसी राज्य समन्वयक हितेश देव शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डेटा ऑफलाइन झाल्याची कबुली दिली पण त्यामागे दुर्भावनायुक्त हेतू असल्याचा आरोप फेटाळून लावला.
त्याचवेळी केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की एनआरसी डेटा सुरक्षित आहे. मंत्रालयाने सांगितले की, ही समस्या लवकरच सोडविली जाईल. त्याचवेळी हितेश देव शर्मा म्हणाले, ‘विप्रोने मोठ्या प्रमाणात डेटासाठी क्लाऊड सर्व्हिस दिली होती आणि त्यांचा करार गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत होता. मागील समन्वयकांनी त्याचे नूतनीकरण केले नाही. तर विप्रोने हे निलंबित केल्यानंतर डेटा 15 डिसेंबरपासून ऑफलाइन झाला. मी 24 डिसेंबरला पदभार स्वीकारला होता.’
त्यांनी सांगितले की, राज्य समन्वय समितीने 30 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत आवश्यक औपचारिकता करण्याचे ठरविले होते आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विप्रो यांना पत्र लिहिले होते. शर्मा म्हणाले, ‘जेव्हा विप्रो डेटा लाइव्ह करते, तेव्हा ते लोकांसाठी उपलब्ध होईल. आम्हाला आशा आहे की दोन-तीन दिवसांत लोक हे पाहतील.’ या विकासावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया यांनी भारतीय महापंजयकांना पत्र लिहून त्यांना त्वरित या विषयाकडे लक्ष देण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘… ऑनलाईन डेटा गायब होणे ही एक दुर्भावनापूर्ण कृत्य आहे याबद्दल पूर्ण शंका आहे.’